marathi blog vishwa

Wednesday 13 April 2011

आस


दूर ची ही वाट ....लांबचा प्रवास
मनी ध्यान तुझे.... भेटायची आस..

सुकला रे घसा ...थकली पाऊले
विरहाश्रूनी झाले ...डोळे माझे ओले..

सुख आणि दुख्ख ...भोगले रे सारे..
तरीही अतृप्त हे.. मन ऊरे मागे...

अजुनी किती धाऊ ...सांग रामराया
"सुधा" म्हणे तुझ्याविना ...जन्म जाई वाया..

-- सुधांशु नाईक, कल्याण -09833299791
(रामनवमी ला सुचलेली कविता)

1 comment:

  1. Vishwanath Ranade22 April 2011 at 17:57

    Jabardast suchate re tula..gr8 aahes...Vishwanath Ranade

    ReplyDelete