marathi blog vishwa

Thursday 30 November 2023

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा…

#सुधा_म्हणे: हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा

30 नोव्हेंबर 23 

मंडळी नुकताच क्रिकेट विश्वकप सर्वानी पाहिला आणि अंतिम सामन्यात झालेल्या पराभवामुळे अनेकांनी अनेक प्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्या. कित्येकांनी मोठमोठे लेख लिहिले. काय चुकलं, काय बरोबर याबाबत अनेक मत-मतांतरे व्यक्त झाली. ज्यांनी आयुष्यात क्रिकेटची बॅट किंवा बॉल हाती घेतला सुद्धा नाहीये त्यांना व्यक्त होताना पाहून मजा वाटते. क्रिकेट हा खेळ आपल्या देशाच्या काना कोपऱ्यात असा काही रंगलाय की कुठेही या विषयावर आपण बोलू शकतो. 

मग मला लहानपण आठवते. दिवसा-रात्री खेळलेले आठवते आणि मग आठवते ते गाणे सुनील गावस्कर यांच्या आवाजातले. रेडिओवर खूप वेळा लागायचे. साधे असे छान गाणे इतकेच वाटायचे त्याकाळी. पण ते फक्त गाणे नव्हते तर जीवनाचे जणू तत्वज्ञान होते असे आता जाणवते.!

या दुनियेमध्ये थांबायाला वेळ कोणाला ?

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला !

क्रिकेटच कशाला रोजच्या आयुष्यात सुद्धा आपण जोवर चालत असतो, कार्यरत असतो तोवरच आपली किंमत असते ना. जो एकदा बाजूला फेकला जातो तो मग विस्मरणात जातो. फार मोठे मोठे राजे इथे होऊन गेले, फार मोठे अभिनेते, गायक-वादक-चित्रकार आदि कलाकार, खेळाडू इथे हजारो वर्षात होऊन गेले पण जे थांबले ते बाजूला पडले संपले हेच तर सत्य. गाण्यातील पुढील ओळी पहा ना;

अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी

डाव तुझा येतांच तू जमविशी आपुली खेळी

मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव

ह्या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुजला धाव

चतुर आणि सावध जो जो,तोच इथे रंगला

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला !

आयुष्याच्या मैदानात आपण उतरतो ते पण अगदी असेच असतं ना ? कामे सुरू करण्यापूर्वी किती अभ्यास करतो, भरपूर प्रकारचे सल्ले घेतो, किती प्रकारचे नियोजन करतो. किती प्रकारची मेहनत करतो.. मात्र जेंव्हा प्रत्यक्ष काम सुरू करतो तेंव्हा आपले कौशल्य पणाला लागते. नियती असो, प्रतिस्पर्धी असो किंवा आपली कमतरता असो हे सगळे यष्टीरक्षक आपला डाव उधळून टाकण्यासाठी अगदी सज्जच असतात. आपण नीट लक्षपूर्वक खेळत राहिलो, आत्मविश्वास आणि अभ्यास यांची सांगड घालून जगत राहिलो तर शक्यतो अपयश येत नाही. एखाद्या क्षणी, एखाद्या डावात हरलो तरी पुन्हा उभे राहण्याची जिद्द अंगी असतेच. ज्याना हे जमते ते यशस्वी होतातच.

या गाण्याचे संगीत देताना, मागे टपला यष्टीरक्षक.. या ओळीनंतर “म्याव म्याव.. म्याव..” असे काहीसे पार्श्वसंगीत होते. लहानपणी रेडिओवर हे गाणे कायम लागायचे आणि त्या संगीताच्या तुकड्यासकट गाणे म्हणणे फार छान वाटायचे. 

सुनील गावस्कर हे त्यावेळी क्रिकेट खेळणाऱ्या आम्हा सगळ्या मुलांसाठी कायमच आदर्श होते. त्यांच्या खेळाची कॉमेंटरी ऐकणे, सनी डेज, आय डॉल्स सारखी त्यांची पुस्तके वाचणे हे फार आवडायचे त्यावेळी. त्यामुळे आपल्या आवडत्या गावस्करचे गाणे लागले की 5 मिनिटे आम्ही ऐकत उभे राहायचो. 

एखादी खेळी असो की वैयक्तिक आयुष्यातील सुखाचे क्षण .. त्यांच्या आयुष्यात त्यांनी जे जे योजले ते ते घडवून दाखवले. अत्यंत दृढ आत्मविश्वास असला की खेळ असो वा आपले जीवन सगळे काही आपण नक्कीच घडवू शकतो हे त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या इनिंगमधून आजवर दाखवून दिले आहे. अगदी असेच प्रत्येकाच्या आयुष्यात हवी तशी इनिंग त्यांना खेळता यायला हवी. ज्याना अशी इनिंग खेळता येते त्यांचे जीवन सुखाचे होऊन जाते. आपल्याला तरी दुसरे आणि काय हवे असते ?

-सुधांशु नाईक(9833299791)

Wednesday 29 November 2023

आयुष्य हे चुलीवरल्या....

#सुधा_म्हणे: आयुष्य हे चुलीवरल्या.. 
29 नोव्हेंबर 23
मित्रहो, तुळशीचे लग्न लागले आणि आता सर्वत्र लग्नसराई सुरू झाली. आपल्या देशात लग्नसराई ही गोष्ट केवळ दोन जीवांचे मिलन यापुरतीच मर्यादित नसते तर त्यात विविध कुटुंबे, व्यावसायिक आदि शेकडो लोक कळत नकळत सहभागी होऊन जातात.
वयात आलेल्या दोन जीवांना एकमेकांची ओढ वाटणे ही नैसर्गिक गोष्ट.
त्याभोवती आपल्या समाजाने इतक्या प्रकारची फोडणी देऊन ठेवली आहे की लग्न ही गोष्ट मग दोन माणसांच्या हातात उरतच नाही त्यात अनेक कुटुंबे एकत्र येतात, रूढी असतात, रीतीरिवाज असतात आणि मग ओठावर गाणे येते;

भिजलेल्या क्षणांना आठवणीची फोडणी
हळदीसाठी आसुसलेले हळवे मन अन कांती
आयुष्य हे चुलीवरल्या कडईतले कांदे पोहे…..

लग्नसराईची तर सगळे विक्रेते आतुरतेने वाट पाहत असतात. हॉलवाले, केटरिंगवाले, दागिनेवाले, हार फुलं विक्रेते, कपडेवाले, घोडेवाले, शिंपी, मेकअपवाले, फोटो-विडिओवाले, मिठाईवाले अशा अनेक व्यवसायांचे गणितच मुळी लग्नसराईच्या दिवसांवर अवलंबून असते. भारताच्या अर्थव्यवस्थेची गणितेच वेगळी असतात. इथे उत्सव नकोत, थाट माट नको  वगैरे कितीही बोलले गेले तरी या सगळ्यामुळे तर पैसा फिरत राहतो. ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून पैसा ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे विविध कामांच्या मेहनतीमुळे येत राहतो आपोआप अर्थव्यवस्थेला चालना मिळत राहते. 
नात्यांच्या या बाजारातून विक्रेत्यांची दाटी
आणि म्हणे तो वरचा ठरवी शतजन्माच्या गाठी
रोज नटावे रोज सजावे धरून आशा खोटी
पाने मिटूनी लाजळूपरी पुन्हा उघडण्यासाठी
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे….

अनेकांना आपल्याला हवा तसा जीवनसोबती मिळतो तोही याच दिवसात. कधी मने आधी जुळतात आणि मग लग्ने होतात तर कधी आधी लग्ने होतात आणि मग मने जुळू पाहतात. याबाबतीतले प्रत्येकाचे सगळे अंदाज वेगळे वेगळेच. प्रत्येकीला आपल्या मनातील राजकुमाराची स्वप्ने जशी असतात तशीच त्याला त्याची राजकुमारीदेखील हवी असतेच. कधी भेटतात एकमेकांना हवे असतात तसे दोघेही..
आणि मग आयुष्य जणू परीकथा वाटू लागते...
दूर देशीच्या राजकुमाराची स्वप्ने पाहताना
कुणीतरी यावे हळूच मागून ध्यानी मनी नसताना
नकळत आपण हरवून जावे स्वतः मग जपताना...
असेच प्रत्येकाच्या बाबत घडत राहायला हवे. प्रत्येकजण स्वप्ने पाहतो हव्या असलेल्या जोडीदाराची. ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरवीत, हवंसं वाटाणारे जिवलग लाभणे यासारखा आनंद दुसरा नाही हेच खरे.!
-सुधांशु नाईक(9833299791)🌿

आयुष्य हे चुलीवरल्या....

#सुधा_म्हणे: आयुष्य हे चुलीवरल्या.. 
29 नोव्हेंबर 23
मित्रहो, तुळशीचे लग्न लागले आणि आता सर्वत्र लग्नसराई सुरू झाली. आपल्या देशात लग्नसराई ही गोष्ट केवळ दोन जीवांचे मिलन यापुरतीच मर्यादित नसते तर त्यात विविध कुटुंबे, व्यावसायिक आदि शेकडो लोक कळत नकळत सहभागी होऊन जातात. वयात आलेल्या दोन जीवांना एकमेकांची ओढ वाटणे ही नैसर्गिक गोष्ट.
त्याभोवती आपल्या समाजाने इतक्या प्रकारची फोडणी देऊन ठेवली आहे की लग्न ही गोष्ट मग दोन माणसांच्या हातात उरतच नाही त्यात अनेक कुटुंबे एकत्र येतात, रूढी असतात, रीतीरिवाज असतात आणि मग ओठावर गाणे येते;

भिजलेल्या क्षणांना आठवणीची फोडणी
हळदीसाठी आसुसलेले हळवे मन अन कांती
आयुष्य हे चुलीवरल्या कडईतले कांदे पोहे…..

लग्नसराईची तर सगळे विक्रेते आतुरतेने वाट पाहत असतात. हॉलवाले, केटरिंगवाले, दागिनेवाले, हार फुलं विक्रेते, कपडेवाले, घोडेवाले, शिंपी, मेकअपवाले, फोटो-विडिओवाले, मिठाईवाले अशा अनेक व्यवसायांचे गणितच मुळी लग्नसराईच्या दिवसांवर अवलंबून असते. भारताच्या अर्थव्यवस्थेची गणितेच वेगळी असतात. इथे उत्सव नकोत, थाट माट नको  वगैरे कितीही बोलले गेले तरी या सगळ्यामुळे तर पैसा फिरत राहतो. ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून पैसा ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे विविध कामांच्या मेहनतीमुळे येत राहतो आपोआप अर्थव्यवस्थेला चालना मिळत राहते. 
नात्यांच्या या बाजारातून विक्रेत्यांची दाटी
आणि म्हणे तो वरचा ठरवी शतजन्माच्या गाठी
रोज नटावे रोज सजावे धरून आशा खोटी
पाने मिटूनी लाजळूपरी पुन्हा उघडण्यासाठी
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे….

अनेकांना आपल्याला हवा तसा जीवनसोबती मिळतो तोही याच दिवसात. कधी मने आधी जुळतात आणि मग लग्ने होतात तर कधी आधी लग्ने होतात आणि मग मने जुळू पाहतात. याबाबतीतले प्रत्येकाचे सगळे अंदाज वेगळे वेगळेच. प्रत्येकीला आपल्या मनातील राजकुमाराची स्वप्ने जशी असतात तशीच त्याला त्याची राजकुमारीदेखील हवी असतेच. कधी भेटतात एकमेकांना हवे असतात तसे दोघेही..
आणि मग आयुष्य जणू परीकथा वाटू लागते...
दूर देशीच्या राजकुमाराची स्वप्ने पाहताना
कुणीतरी यावे हळूच मागून ध्यानी मनी नसताना
नकळत आपण हरवून जावे स्वतः मग जपताना...
असेच प्रत्येकाच्या बाबत घडत राहायला हवे. प्रत्येकजण स्वप्ने पाहतो हव्या असलेल्या जोडीदाराची. ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरवीत, हवंसं वाटाणारे जिवलग लाभणे यासारखा आनंद दुसरा नाही हेच खरे.!
-सुधांशु नाईक(9833299791)🌿