marathi blog vishwa

Wednesday 16 May 2012

वारा विसरला गारवा .. अन उरात पेटला वणवा..

विहिरी शोधताहेत पाणी.. आणि प्राणी शोधताहेत चारा..

दुष्काळाचा काटा मात्र...भुईत खोलवर गेलेला....

उपाशी पोटे आणि ओढलेले चेहेरे

पोट तुडुंब भरलेल्यांची ...तिथे उगाच झाली गर्दी..

मनात दुष्काळ गावात दुष्काळ...

पुन्हा काळ्या ढगांनी कधी भरून येईल आभाळ??

...सुधांशु नाईक --१६/५/१२

Tuesday 1 May 2012

दिवस गेला पुन्हा आली मंद पाऊली सांज गं..
सखा येईल आता म्हणुनी मनात उमलते जाई गं..

सांज होती खुळवणारी जाई उधळी अत्तर गं..
चमचमणारा चंद्र होई आकाशीचे झुंबर गं..

सांज गेली रात आली अवघी आशा सरली गं..
मनातली जाई माझ्या उदास एकटी मिटली गं..

दिवस येईल पुन्हा एकदा स्वप्ने घेऊन हळवी गं..
एका डोळ्यामध्ये आसू दुसऱ्यामध्ये हासू गं..

---सुधांशु नाईक ..१/५/१२.